अशीही एक आठवण...
एका मैत्रीणीच्या सांगण्यावरुन माझी आणि वपुंची ओळख झाली.पुस्तकरुपानेच ती...
तसे वपु मला अपरिचीत नव्हतेच.पण खूप असा परिचय ही नव्हता.फक्त एक प्रसिद्ध लेखक एव्हढीच काय ती कल्पना.त्यांची 2-3 कथानक मी ऐकली होती.audio clips वरच. सगळ्यात आवडला तो त्यांचा आवाज,सांगण्याची ढब.एक निराळीच शैली, निराळ्याच माणसाची..
अमिताभ बच्चन च्या आवाजाचे लोकं fan आहेत. मी ही आहे. जसा त्यांचा तसा वपुंच्या आवाजाचा.अमिताभजींच्या आवाजात एक दरारा दिसतो. वपुंच्या आवाजात एक आपलेपणा..फरक काय तो हाच..मला जाणवलेला....
वपुंचे पार्टनर,वपुर्झा,दोस्त ही 2-3 पुस्तके मला वपुमय करण्यासाठी पुरेशी होती. मला त्यांची चाललेली लेखणी आवडली.भावली.त्यांच्या अनेक कथांनी खूप हसवल.कधी त्या मनाला हळव असल्याची चाहुलही दिली..आणि कधी दिलखुलास एक नवा दोस्त आयुष्याच्या दोर्यात विणला जावा असा दोस्तही बनवल..सहवास न लाभता,प्रत्यक्ष न भेटता त्यांनी माझ्यासारख्या अगणित लोकांना आपलस केलय.पत्ररुपानेही मने जुळतात हे त्यांनी सिद्ध केल. कुठलाही प्रसंग वाचताना त्याची मनात एक छबी तयार होते.माझ्यातरी..कुठल्याही लेखकाला तेच मोठ पारितोषिक असेल..आणि वपुंकडे तर अशा पारितोषिकांची खाणच मिळेल..माझ्यासाठी तरी तुम्ही खूप काही दिलय वपु..खरच तुम्हाला भेटण्याची इच्छा वारंवार होतेय.तुम्ही तुमच्या अनुभवातुन सांगतानाचा काळ आज माझ्यासमोर उभारतोय.मला खूप लिहावस वाटतय तुमच्यासाठी..तुमच्यावर..
पण शब्द मलाच नाही सुचत.
काय करू...??You are great वपु...yess you are...
कारण आजही तुम्ही आहात.
माझ्यासोबत तरी..
त्या पुस्तकांमधूनच सही एक सच्चा दोस्त कमावल्याच सुख आहे...जन्मभराचच...
अशीच एक तुमची आठवण तुमच्यासाठी खास....
दुपारचे बरोबर दिड वाजलेले.उन्हाळ्याचे दिवस.नुकतचं आंघोळ करून मेस मधून जेवण करून आलेलो.जिना चढल्याने माझ्यासोबत सगळ्यांनाच धाप लागलेली. जेवणही full झालेलं. डोळ्यात सुस्ती होती. पलंगावर बसलो. आणि हातात आलं वपुंच "प्लेझर बॉक्स."
पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हाच ठरवलं मस्त वाचत वाचत लागणार्या सुखद झोपेचा आनंद घ्यायचा..अवस्थाच तशी होती आणि परिणामी कृतीही.. बसून वाचत असणारा मी केव्हा एकदा पलंगावर लवंडलो ते मला माझच कळालं नाही..तेवढ्यात एक ओळ वाचण्यात आली. "अंत आणि एकांत यात माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.म्हणून महापालिकेतील 27 वर्षांच्या नौकरीत माणूस जोडण्याच काम मी केलं. केवळ त्या एकांताच्या भितीने.."
हे वपु पण असं मधेच एखाद वाक्य टाकतात.त्याच्या आधीची 4-5 वाक्ये हमखास डोक्यावरुन गेलेली असतात..पण त्या एका वाक्याने वळण लागतं..त्या विचारांना आणि सुरू होतो त्यांचाच खेळ..एकीकडे वाचन आणि एकीकडे तो खेळ..प्लेझर बॉक्स मधे त्यांनी एक अनुभव दिलाय.जो मनाला खूप भावला..
" एका पुस्तकाच्या प्रकाशना संबंधी त्यांनी लतादिदिंना एक पत्र पाठविले. अर्थात ते पुस्तक त्यांनाच अर्पण होत. तसा वपुंचा आणि मंगेशकर कुटुंबीयांचा जुनाच संबंध. ह्रदयनाथ मंगेशकरांच्या अनेक कार्यक्रमांचे निवेदन त्यांनीच केलेले..परंतु लतादिदिंना पाठवलेल्या त्या पत्राचं त्यांना ना काही उत्तर आलं ना लतादिदिंनी त्या पत्राचा काही पाठपुरावा केला..त्यावेळी त्यांच्या ज्या भावना होत्या,त्यांना जे feel झालं ते निराळचं होत. एखाद्याला इतक्या आतुरतेने पाठवलेल्या पत्राच्या उत्तराची जेव्हा आपण अपेक्षा करतो आणि त्या पत्राच उत्तर येत नाही तेव्हा मनातल्या भावनांचा खेळ ज्याचा त्यालाच कळतो.आणि त्या वेळेस वपुंना वाटलं ' जे पत्र न चुकता रोज माझ्यादारासमोर रांगोळी काढतात,काही नावासहीत तर काही अनामिक..अशा पत्र पाठवनार्यांना कसं वाटत असेल..ज्यांना त्या पत्राचं उत्तर नाही भेटतं..' म्हणून त्या दिवशीच त्यांनी ठरवून टाकलं की येणार्या प्रत्येक पत्राला छोटं का होइना उत्तर पाठवायचं..
आणि त्या लेटर बॉक्स मधून आलेल्या पत्रांना उत्तर देताना एखाद्याचं मन राखल्याचा जो आनंद त्यांना मिळत होता त्यातुनच आणि त्याच लेटर बॉक्स च्या पत्रांच्या देवाणघेवाणीतून साकारलेलं पुस्तक म्हणजे 'प्लेझर बॉक्स.'
ते पुस्तक वाचता वाचतानाच माझ्या बसण्याच्या अवस्था बदलत होत्या..आणि एका क्षणी मलाच झोप कधी लागली ते कळालं नाही..दुपारच्या झोपेत स्वप्न पडणं जरा अजबच..पण मला पडतात...आणि आजही पडलं...
"मला माझ्या रोजच्या जीवनात येणार्या अडचणी,माझ्या मनात येणारे विचार आणि अनेक अशा गोष्टी मी सांगत होतो..वपुंनाच..त्यांचेही उत्तरे येत असत..कदाचित माझी अपेक्षा असल्यानेच...एका पत्रामधे मी वपुंना त्यांचा मोबाइल नंबर मागितला...आणि बेझिजक त्यांनी दिलाही..
पत्रातील गप्पांच्या त्या ओढीला मला प्रत्यक्ष अनुभवायच होत..प्रत्यक्ष त्यांच्या आवाजात ते माझ्याशी बोलताना मला ऐकायचं होत..त्यांच्या या पत्रातील 'दोस्ताला' त्यांच्याशी हितगुज करायच होत..मित्रांना मी मोबाइल मधील त्यांच नाव अभिमानाने दाखवत असे..पण माझी हिम्मत त्यांना फोन करण्याची कधीच झाली नाही.. एके दिवशी बळ एकवटुन,त्यांच्याशी बोलायच ठरवुन मी त्यांच्या मोबाइल मधील नावावर गेलो..त्यांच्या नावावर click केलं आणि बघितल तर नंबर नव्हताच..एखाद्या भयावह स्वप्नातुन जागा झाल्यासारखा मी झोपेतुन जागा झालो..चेहरा घामाने भिजला होता..शर्ट ओला झाला होता..मी नकळत मोबाइल हातात घेतला आणि वपुंच नाव मोबाइल मधे शोधु लागलो...तेवढ्यात वास्तवाच भान मला आलं..
तो क्षणच असा होता की शब्द अपुरे पडत होते..तो क्षणच असा होता की एका न पाहिलेल्या व्यक्तिसाठी डोळ्यांत आसवे आली होती.. त्यांच्या भेटीसाठी मन अधीर झालं होत..पण वास्तवातील सत्य ना त्या आसवांना रोखु शकलं ना त्यांच्या आठवणीतुन मला बाहेर काढु शकलं.
कारण वपुंना भेटण्याचा,बोलण्याचा दैवयोग माझ्या मोबाइल मधुनच नव्हे तर आयुष्यातुनच
गेला होता...''
-मकरंद
©makarand92.blogspot.com
©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा